About Us

ॲड. जयश्री शेळके

महाराष्ट्रातील कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी महिलांच्या यादीत अग्रगण्य नाव म्हणजेच मा. जयश्रीताई शेळके. सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना त्यांनी सहकार, महिला सक्षमीकरण, बचतगट, कृषी, उद्योग, राजकारण अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनची स्थापना केली. दिशा अर्बन पतसंस्थेची स्थापना करून महिलांना भांडवल उपलब्ध करून दिले, तसेच अनेकांना रोजगार मिळवून दिला. कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी धडाडीने मदतकार्य केले. `दिशा हेल्पलाईन`द्वारे अनेक रुग्णांना उपचार, औषधी, जेवण, अन्नधान्य किट या स्वरूपात मदत पुरवली.

मा. जयश्रीताई शेळके सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव आहेत. साखळी बु. जिल्हा परिषद सर्कल सदस्य म्हणून कार्य करीत असताना त्यांनी सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन नागरी विकासाचे अनेक प्रश्न सोडवले. उत्कृष्ट वक्त्या असलेल्या जयश्रीताईंना परिसरात लोकप्रिय लोकनेत्या म्हणून ओळखण्यात येते. काँग्रेस पक्षात विविध पदांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. कर्तव्यनिष्ठ आणि बहुआयामी नेतृत्व म्हणून जयश्रीताई शेळके यांनी जनतेत अढळ स्थान निर्माण केले आहे.

आमचा दृष्टिकोन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "राजकारण ही प्रत्येक समस्येची गुरुकिल्ली आहे." जयश्रीताईंचा विश्वास आहे की राजकारणाच्या माध्यमातून सर्व सामाजिक प्रश्न सोडवले जाऊ शकतात. जर व्यवस्था बदलायची असेल तर त्या व्यवस्थेत प्रवेश करावा लागतो.

आमचे ध्येय

असा समाज घडविणे ज्यात युवा, स्त्री-पुरुष आणि लहान मुले समाधानी असतील आणि आपले ध्येय प्राप्त करतील. महिला सक्षम असतील, तरुणांना रोजगार असेल तर सशक्त राज्य आणि प्रगत देशासाठी सक्षम तरुण आणि महिला योगदान देतील.